मुंबई : आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यात राष्ट्रवादीत काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बारामती तालुक्यातील सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. आहे. तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.