मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणीसह अनेक गावांना महाराष्ट्रात यायची इच्छा असून विरोध केला जात आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात.
दोघे ही खोटे बोलुन जनतेला येड्यात काढत आहेत त्या ट्वीट मुळे कर्नाटक मधील मराठी माणसाला मार खावा लागला हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष्यात ठेवावे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 19, 2022
या संदर्भात दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर तात्पुरता तोडगाही काढला. मात्र, तरीही सोमवारी पुन्हा एकदा सीमाभागात कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला. यामुळे वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघे ही खोटे बोलुन जनतेला येड्यात काढत आहेत त्या ट्वीट मुळे कर्नाटक मधील मराठी माणसाला मार खावा लागला हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष्यात ठेवावे.’