मुंबई – राज्य सरकारने सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा घाट घातला आहे. काही दिवसांपूर्वीच तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याची जाहिरात समोर आली होती. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.
यानंतर आता शासकीय वैद्यकीय महविद्यालयामध्ये आता कंत्राटी पद्धतीने पदं भरण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “शासकीय वैद्यकीय महविद्यालयामध्ये आता कंत्राटी पद्धतीने पदं भरण्यात येणार आहेत. इकडे युवकांनी भरती होईल म्हणून अभ्यास करायचा आणि तिकडे मात्र सरकारने कंत्राटी भरती करायची. कंत्राटदार कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा अप्रत्यक्षपणे ताबा घ्यायचा आणि मनमानी करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये चालवायची. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी..”
शासकीय वैद्यकीय महविद्यालयामध्ये आता कंत्राटी पद्धतीने पदं भरण्यात येणार आहेत. इकडे युवकांनी भरती होईल म्हणून अभ्यास करायचा आणि तिकडे मात्र सरकारने कंत्राटी भरती करायची. कंत्राटदार कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा अप्रत्यक्षपणे ताबा घ्यायचा आणि मनमानी… pic.twitter.com/bREPYnRbEF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2023
पुढे त्यांनी लिहीले की, “आपल्या अत्यंत जवळच्या कंपन्यांना काम मिळावं म्हणून कंत्राटी भरतीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेचा मांडलेला हा बाजार गोरगरीब जनतेला आणि युवकांना आयुष्यातून उठवणारा आहे. यामुळं कंत्राटदार कंपन्या मोठ्या होतील पण गोरगरिबांचा जीव जाईल हे सरकारने लक्षात घेऊन कंत्राटी भरतीचा GR त्वरित रद्द करावा.” दरम्यान, रोहित पवार यांनी अनेकदा या मुद्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, यापूर्वी रोहित पवार यांनी केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, असा खोचक सल्ला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला होता.