छत्रपती संभाजीनगर – “हे बिल्डरांचे सरकार आहे. त्यांच्या डोक्यावर कर्ज असते तर ते माफ झाले असते. मात्र, शेतकऱ्यांसाठी (farmers) सरकारला वेळ नाही. मात्र, शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आम्ही तुमच्या समवेत आहोत,’ असा विश्वास ठाकरे गटाचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मराठवाडम्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी कापूस, टोमॅटो, मोसंबी, सोयाबीन उत्पादक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची बांधावर भेट घेतली. तसेच त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले.
आज पैठण तालुक्यातील निपाणी येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संवाद दौऱ्यास सुरुवात केली. ह्यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन, पिकाची पाहणी केली.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना लक्षात येतंय, निसर्गाच्या प्रकोपामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचत… pic.twitter.com/lR8mut3dbZ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 15, 2023
या आधीचे कृषी मंत्री कधीच बांधावर जात नव्हते. आताचे कृषीमंत्रीही जातील असे वाटत नाही. मात्र, शेतकऱ्यांचा बांधावर जाण्याचा प्रश्न नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील आहे, हे महत्त्वाचे आहे. जे खुर्चीत बसले आहे, त्यांना केवळ उद्योजक, बिल्डरांची काळजी आहे. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही. तसेच, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नियमात अनेक बदल करण्याची आवश्यकता सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
पिक विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.