जयपूर – राजस्थानातील भारतीय जनता पार्टीचे भजनलाल शर्मा यांचे सरकार हे रिमोट कंट्रोलवर चालत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केली आहे. राज्यात आता मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री जास्त पॉवरफुल आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
तसेच राज्याचे मुख्य सचिवच मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत अशा आशयाचे विधानही गेहलोत यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की आज दोन तीन महिने झाले आहेत. दु:ख एकाच गोष्टीचे आहे की हे सरकार चालले कशाला आहे अशी चर्चा घराघरात होऊ लागली आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांना याचा दोष दिला जाऊ शकत नाही. याचा दोष हा भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडकडे जातो. जे काही सुरू आहे ते मात्र लोकशाहीच्या भावनेच्या विरोधात जाणारे आहे.
दरम्यान, गेहलोत यांच्या टीकेला राजस्थान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की राजस्थान सरकार अत्यंत मजबुतीने आणि योग्य समन्वयाने काम करते आहे.