नवी दिल्ली – तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्या फेरीच्या रिकर्व्ह मिश्र सांघिक गटात भारताच्या तरुणदीप रॉय आणि रिद्धी फोर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तुर्की येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने ग्रेट ब्रिटनचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
तरुणदीप व रिद्धी हे पहिल्यांदाच एकत्र खेळले व त्यांनी 18-17 असा विजय मिळवला. भारतीय जोडीने ब्रिओनी पिटमन आणि ऍलेक्स वाईज या ब्रिटिश जोडीवर मात केली. या फेरीतील भारताचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. याआधी अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी यांच्या पुरुष कंपाउंड संघानेही सुवर्ण पदक जिंकले.