Odisha Train Accident – ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय कोरोमंडल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बाप लेकीला आहे. शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बाप आणि त्याच्या आठ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत हे घडले. शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये त्यांच्या जागा बदलल्या. त्यामुळे अपघातात त्यांचा जीव वाचला आहे. कारण ज्या डब्यात त्याचं तिकीट होतं, त्याचा अपघात झाला. त्यात बोगीतील बहुतांश लोकांचा मृत्यू झाला.
मिळलेल्या माहितीनुसार, वडील-मुलगी दोघे खडगपूरहून ट्रेनमध्ये चढले आणि त्यांना कटक येथे उतरावे लागले कारण शनिवारी त्यांची डॉक्टरांची भेट होती. थर्ड एसी कोचमध्ये प्रवास करण्याचे तिकीट असतानाही मुलीने खिडकीजवळ बसण्याचा हट्ट धरला. खरगपूरमधील सरकारी कर्मचारी देब यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे विंडो सीटची तिकिटे नव्हते. आम्ही टीसीला विनंती केली. यावर त्यांनी शक्य असल्यास इतर प्रवाशांसोबत त्यांच्या जागा बदलून दिली जाईल अशी सूचना दिली, यावर आम्ही दुसऱ्या कोचकडे जाऊन दोन लोकांना विनंती केली आणि त्यांनी होकार दिला. देब म्हणाले की, ते आमच्या जागी आणि आम्ही जागेवर प्रवास केला. आमची जी सीट होती ती या बोगीपासून भरपूर लांब होती.
सीटची बदल झाल्यानंतर काही वेळातच ट्रेनमध्ये भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने, वडील-मुलगी ज्या डब्यात प्रवास करत होते त्या डब्याचे फारसे नुकसान झाले नाही, तर इतर डब्यांचे, जिथे त्यांची जागा आरक्षित होती, त्यांचे नुकसान झाले. त्याचे अनेक भाग झाले आणि त्यात अनेक लोक मरण पावले.
देब म्हणाले की, आमच्यासोबत जागा बदलण्यास तयार झालेल्या दोन प्रवाशांची स्थिती आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो. त्याच वेळी, आम्ही या चमत्कारासाठी सर्वशक्तिमान देवाचे आभारी आहोत. आमच्या डब्यातील जवळपास सर्व प्रवासी सुखरूप होते.’