मुंबई – नव्या संसदभवनाच्या मुद्द्यावरून काही विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावरून आज ‘सामना’ रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सन्गोल’ हे राजेशाही म्हणजे बादशाहीचे प्रतीक आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांना राज्यघटना बाजूला करून देशाचे राजे व्हायचे आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारल्याचे सामनात म्हंटले आहे. याशिवाय ‘इतिहास 2014 नंतर थांबलाय’ असे यात म्हंटले आहे.
इतिहास 2014 नंतर थांबलाय
नवे संसद भवन वादाचा विषय ठरत आहे. 2014 नंतर ‘भारत’ निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांचे हे नवे संसद भवन. त्याला इतिहास नाही. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंट कार्यालयात जात तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे अशी त्यांची भावना होत असे. नव्या संसद भवनाच्या लॉबीत चालताना असे वाटेल? इतिहास 2014 नंतर थांबलाय. ‘सन्गोल’ म्हणजे राजदंडाचे आगमन दिल्लीत झाले. राजदंडासमोर पंतप्रधान मोदी यांनी साष्टांग दंडवत घातल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ‘सन्गोल’ हे राजेशाही म्हणजे बादशाहीचे प्रतीक आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांना राज्यघटना बाजूला करून देशाचे राजे व्हायचे आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारल्याचे सामनात म्हंटले आहे.
राज्यघटनेची अंमलबजावणी चुकीच्या लोकांच्या हाती गेली तर काय होते याचा अनुभव सध्या जगातले अनेक देश घेत आहेत. रेगन, निक्सन, ट्रम्प, क्लिंटन यांच्या काळात अमेरिकेनेही तो घेतला. हिंदुस्थान सध्या तो घेत आहे. मोदी यांचे समर्थक म्हणतात, “देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले!” मोदी आल्यानंतर हिंदुस्थान निर्माण झाला असे त्यांना वाटते. त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2014 पर्यंत या देशात प्रजासत्ताक होते. त्यानंतर ते संपले. सन्गोल हे त्याचे प्रतीक आहे.
9 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही
मोदी व शहा हे दोन्ही नेते पराक्रमी आणि हिमतीचे आहेत असे सांगितले जाते, पण पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी नसतील तर या सगळयांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. मोदींच्या सरकारला याच काळात नऊ वर्षे पूर्ण झाली, पण गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी हे पत्रकार परिषद घेत नाहीत
देशाची स्थिती ही राज्यघटना व लोकशाहीला मारक आहे. नवी संसद देशाच्या इतिहासाची साक्षीदार खरेच आहे काय? नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हाचे भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्याशी घटनात्मक सुधारणांची चर्चा करण्यासाठी पार्लमेंटमधील कार्यालयात जात, तेव्हा त्या इमारतीत चालताना इतिहास आपल्या बाजूने चालत आहे, अशी त्यांची भावना होत असे. हिंदुस्थानच्या जुन्या पार्लमेंटमध्ये चालताना भारतीय स्वातंत्र्य लढयाचा, राज्यघटना निर्मितीचा इतिहास आपल्या बाजूने चालत आहे असे नेहमीच वाटत आले. आता नवे संसद भवन उभे राहिले. 2014 नंतरच्या कोणत्या घटनासोबत चालतील तेवढेच पाहायचे आहे, असे सामनामध्ये म्हंटले आहे.