नवी दिल्ली – बांगलादेशात मालवाहू रेल्वे पेटवल्यामुळे किमान चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. ही रेल्वे शुक्रवारी भारताच्या सीमेजवळील बेनापोल येथून राजधानी ढाका येथे जात होती. कमलापूर रेल्वे स्थानकाजवळ ही रेल्वे पेटवण्यात आली होती. या रेल्वेमधून २९२ प्रवासी भारतातून बांगलादेशात परत येत होते. या प्रवाशांमध्ये काही भारतीय प्रवासी देखील होते. अजून सर्व प्रवाशांच्या सुरक्षिककेबाबतची पूर्ण माहिती मिळालेली नाही. असे अधिकार् यांनी सांगितले.
बंगलादेशात उद्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहिष्कार घातला आहे. बीएनपीच्या कार्यकर्त्यांनीच ही जाळपोळ केल्याचा संशय आहे.
भारताचे ३ निवडणूक निरीक्षक ढाक्यामध्ये दाखल
बंगलादेशात उद्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी १०० परदेशी निरीक्षक यासाठी बांगलादेशात गेले आहेत. यामध्ये भारताच्या निवडणूक आयोगाच्या तिघा निरीक्षकांचाही समावेश आहे. तर अन्य काही देशांचे एकूण १२२ निरीक्षक ढाक्यामध्ये पोचण्याच्या तयारीत आहेत. बीएनपीच्या बहिष्कारामुळे बांगलादेशातील निवडणूक प्रक्रीयेवर संयुक्त राष्ट्राकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.