लाहोर :- आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांसाठी दुबईची निवड केली जाते मग आशिया करंडक स्पर्धेसाठी तेथेच हायब्रीड मॉडेलनूसार सामने का आयोजित केले नाहीत, अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया क्रिकेट समितीवर (एसीसी) टीका केली आहे.
या स्पर्धेचे मुळ यजमानपद पाकिस्तानकडे असतानाही केवळ भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही म्हणून श्रीलंकेला संयुक्त यजमान बनवले गेले. मात्र, श्रीलंकेत या कालावधीत पाऊस असतो हे माहिती असतानाही आशिया करंडक स्पर्धेचे सामने का घेतले जात आहेत.
यावर,दुबईत प्रचंड उन्हाळा असतो असे कारण एसीसीने दिले आहे मात्र, ऐन उन्हाळ्यातच आयपीएलचे सामने दुबईत खेळवले गेले आहेत. मग जर त्रयस्थ ठीकाणीच भारत व पाकिस्तानचे सामने खेळवायचे होते तर दुबईची निवड का केली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.