नवसारी – गुजरात मध्ये नवसारी जिल्ह्यातील तलावात पाच पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यात तीन मुले आणि दोन प्रौढांचा आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या तलावाच्या परिसरात काल सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
त्यावेळी किनाऱ्याला लागलेल्या बोटीत चढणे व उतरण्यासाठी एकाच वेळी मोठी गर्दी झाल्यामुळे ही बोट उलटली. त्यात 20 जण बुडाले होते पण त्यातील पंधरा जणांना वाचवण्यात यश आले तर पाच जण बुडुन मरण पावले.
सोलधरा इको पॉईन्ट तलावात ही घटना घडली. नवसारी जिल्ह्यतील चिखली तालूक्यात हे पर्यटन स्थळ आहे. तेथे बोटींग साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी सायंकाळी या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.