ठाणे : ठाणे शहरात तिहेरी तलाक दिल्याच्या आरोपावरून एका कुटूंबातील दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. याबाबात पिडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती शाकीर शेख आणि सासरचे अन्य चार जण तिचा छळ करत होते.
मोटार सायकल आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आण अन्यथा जीवंत जाळू, अशी धमकी देत असत. या त्रासाला कंटाळून या महिलेने माहेरी राहण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेखने तलाकचा तीनदा उच्चार करत तिला तलाक दिला, असे फिर्यादित म्हटले आहे.
पोलिसांनी या बाबत शुक्रवारी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला. तसेच मुस्लिम महिला हक्क संरक्षण आणि विवाह कायद्यानुसारही गुन्हा नोंदवला आहे, असे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.