पाचगणी – गेल्या १३ वर्षाहून अधिक काळ जावळीच्या अस्मितेचा प्रश्न झालेला बोंडारवाडी धरणाला प्रशासकीस लाल फितीत अडकवून जावळीच्या शेतकऱ्याला शेतीच्या पाण्याकरीता हतबल करणाऱ्या सरकार विरोधात जावळी तालुक्यातून आता शेतकरी बोंडारवाडी धरणाकरीता करो किवा मरो अशी भूमिका घेत जावळीचा शेतकरी मंत्रालयावर “लॅागमार्च “ काढणार असल्याची भूमिका धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत केळघर येथे आयोजित ५४ गांवाच्या बोंडारवाडी धरणकृती समितीच्या सभेत जाहीर करण्यात आली.
बोंडारवाडी धरणाचा प्रश्न भिजत पडला आहे . सरकार मागे, सरकार बदलत आहे. मात्र प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना बोंडारवाडी धरणाचा मुद्दा आजही दुर्लक्षित झाला आहे . जावळीचा युवक मुंबई येथे जाऊन पाणी नसल्यामुळे शेतीत उदरनिर्वाह चालत नसल्यामुळे माथाडी कामगार म्हणून विस्थापित झाली आहे, अशी भावना मेळाव्यात जमलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली .
डॅा. भारत पाटणकर यांनी यावेळी सरकारला १५ दिवसाची जाहीर नोटीस दिली जाणार आहे, अशी माहिती दिली. सरकारने जर आमच्या दिलेल्या नोटीशीची दखल घेतली नाही प्रशासकीस स्तरावर धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकण्याकरीता वेळ दिली नाही . तर जावळी तालुक्यातील बोंडारवाडी गावातून शेतकऱ्यांना घेऊन पायी मुंबई मंत्रालयापर्यत लॅागमार्च काढणार, असे बोंडारवाडी धरण कृती समितीकडून यावेळी डॅा. भारत पाटणकर यांनी सांगितले .
बोंडारवाडी धरणाच्या स्वप्नपूर्तीकरीता हजारो शेतकरी आता प्रशासनाच्या हालचालीकडे लक्ष ठेवून बसले आहेत . हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बोंडारवाडी धरणाच्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देत जलसपंदा विभागाकडुनच बोडांरवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास दिला असताना, मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तर डोंगराळ भागातील असल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांकडे लॅागमार्चमधून बोंडारवाडी धरणाकरीता करो किंवा मरो लॅागमार्चच्या भूमिकेतून पुढे जाणार असे धरणग्रस्त जनतेने घेतली आहे.