Farmers’ ‘Delhi-Chalo’ march। केंद्र सरकारकडे मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्याआधी आज शेतकरी संघटना केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करणारेत. त्यानंतर शेतकरी आपली भविष्याची रणनीती ठरवतील. मात्र, शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असताना केंद्र आणि राज्यांकडून सुरक्षेबाबत ठोस व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीपर्यंत पोहोचू नये म्हणून पोलिसांनी अनेक सीमांवर बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली-चलो’ मोर्चाला लक्षात घेऊन सिंघू बॉर्डरसह पूर्वोत्तर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सीमेवर काटेरी तार, क्रेन आणि लोखंडी खिळे बसवण्यात येत आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
दिल्लीत ही कडक सुरक्षा व्यवस्था Farmers’ ‘Delhi-Chalo’ march।
दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर कलम 144 लागू केले आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतही कलम 144 लागू करण्यात आले आहे, तर दिल्लीला हरियाणा आणि यूपीशी जोडणाऱ्या तीन प्रमुख सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच गाझीपूर सीमा भागात आरपीएफचे जवानही तैनात करण्यात आलेत. तिन्ही सीमेवर क्रेनच्या साहाय्याने काँक्रीटचे अडथळे, रस्त्यावर टाकण्यात आलेले धारदार गतिरोधक, काटेरी तार, बॅरिकेड्स लावलेत.
राजधानीत 1 महिन्यासाठी कलम-144 Farmers’ ‘Delhi-Chalo’ march।
दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत एक महिन्यासाठी कलम 144 लागू केले आहे. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे. या अंतर्गत लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारची निदर्शने आणि रॅली काढण्यास बंदी असेल. सीमेवरून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या प्रवेशावरही बंदी असणार आहे. एवढेच नाही तर लाऊड स्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आलीय. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.