हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शेतकरी आंदोलनाचा सहावा दिवस आहे. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन पुकारले आहेत. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक होत असल्याचे बघायला मिळते. आज संतप्त शेतकऱ्यांनी येलदरी ते नाका कनेरगाव या राज्य रस्त्यावर आजेगाव येथील चौफुलीवर व पानकनेरगाव मागील दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही प्रशासनाकडून तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक शेतकऱ्यांनी घेतला आहे. सकाळीं ९ वाजता पासुन हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सेनगाव मार्गे जाणारा नाका कनेरगाव ते जिंतूर या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. सद्या गोरेगाव ते सेनगाव या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी सकाळपासून येलदरी ते कनेरगाव या राष्ट्रीय महामार्गावर व सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्ग पानकनेरगाव आजेगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाकडे जाणारी वाहतूक टप्पे झाली आहे तर दुसरीकडे गोरेगाव येथे शेतकऱ्यांची रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला आहे.
सेनगाव तालुक्यातील चार मंडळी अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून या मंडळाची शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून मागील सहा दिवसांपासून गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. गोरेगाव येथे सुमारे 40 लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे नामदेव कावरखे यांच्या शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी ही केली जोपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही तो पर्यंत आंदोलन चालूच राहिल असे या शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. आज चक्का जाम केला उद्या ट्रक फोडू आणि आंदोलन अजुन तीव्र करू अशा ईशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्हात गेल्या सहा दिवसा पासून विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. मात्र सरकारकडून यांची दखल घेतली जात नाही त्यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक होत आहेत. शिंदे सरकार विरोधात चांगलीच घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध करत आहेत. खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हें हिंगोली दौऱ्यावर आले होते तेव्हा त्याना शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते कि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल मात्र जिल्ह्यातील अनेक मंडळे हे अतिवृष्टीतून वगळन्यात आले आहेत मात्र सरकार कडून ह्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आज पानकनेरगाव येथील आंदोलन तीव्र होऊ नये म्हनून पोलिसांनी आंदोलन करण्याना ताब्यात घेतले होते.