नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आज 20 व्या दिवशीही लढा सुरूच आहे. मात्र केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचीच भाषा करीत असून अंतिम काहीही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे चित्र आजही तसेच दिसत आहे.
आंदोलनादरम्यान आणखी एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; मृतांची संख्या झाली एवढी
अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे मोदी सरकार ?
दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलनाचा गड लढत आहेत. या आंदोलनात तरुण शेतकरी, महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांचाही समारवेश आहे. नुकतेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या मृतांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले होते. मात्र, या मुद्द्यावरूनही सरकारने दुर्लक्ष केले. तर आता त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
For Modi Govt:
Dissenting students are anti-nationals.
Concerned citizens are urban naxals.
Migrant labourers are Covid carriers.
Rape victims are nobody.
Protesting farmers are Khalistani.And
Crony capitalists are best friends.— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 15, 2020
काय म्हणाले राहुल गांधी
“मोदी सरकारसाठी विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत. चिंता व्यक्त करणारे नागरिक शहरी नक्षलवादी आहेत. प्रवासी मजूर कोरोनाचे प्रसारक आहेत. बलात्कार पीडित त्यांच्यासाठी काहीही नाहीत. आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत आणि भांडवलदार मात्र पक्के मित्र आहेत”
तत्पूर्वी, भारतीय जनता पार्टीच खरी तुकडे-तुकडे गॅंग आहे. तो पक्ष हिंदू आणि शिखांना एकमेकांविरोधात उतरवरून पंजाबमध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी मंगळवारी केला.