Lok Sabha Elections 2024 । केरळमधील वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढणार आहे. येत्या २ दिवसांनी म्हणजे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळची वायनाडची लढत राहुल गांधींसाठी 2019 वर्षाप्रमाणे सोपी नसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सीपीएम नेत्या ॲनी राजा यांची उमेदवारी नाही तर वायनाडचे स्थानिक प्रश्न आहे. वायनाडचे स्थानिकांचे प्रश्न काँग्रेससमोर आव्हान आहेत.
सर्वात मोठा मुद्दा लोकसभा मतदारसंघात पडणाऱ्या जंगलाचा आहे. आकडेवारीनुसार, वायनाड जिल्ह्याचा 36 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राहुल गांधींनी संसदेत हा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल स्थानिक प्रश्नही उपस्थित करत नाराजी व्यक्त करत आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघातील सुलतान बथेरी शहराजवळील वडाक्कनाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोक 6 वाजता दुकाने बंद करतात. दुकान लवकर बंद करण्यामागच्या कारणाविषयी बोलताना असाच एक दुकानदार सांगतो, “दुकान बंद करण्याची घाई झाली आहे, या मार्गावरील प्रवाशांना वन्य प्राण्यांपासून सतत धोका असतो. संध्याकाळनंतर लोक या रस्त्यावरून चालण्यास घाबरतात. त्यामुळे दुकान उघडे ठेवण्यात अर्थ नाही.” वायनाडमध्ये वन्य प्राण्यांचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या तीन वर्षांपासून लोक लवकर त्यांच्या घरी जातात.
वडक्कनाड येथे राहणारा गोपालन हा व्यापारी आणि वृत्तपत्र एजंट आहे. तो म्हणतो,’संध्याकाळी ७ नंतर जीव वन्य प्राण्यांच्या दयेवर असतो. यानंतर लोक खरेदीसाठी घराबाहेर पडत नाहीत. गावाबाहेर काम करणाऱ्यांनी अंधार पडण्याआधीच घर गाठायचं ठरवलं. मुले संध्याकाळी शिकवणीला जात नाहीत.’
Lok Sabha Elections 2024 । राहुल गांधींबाबत नाराजी
राहुल गांधींबद्दल नाराजी व्यक्त करताना आणखी एक शेतकरी म्हणाला,’प्रत्येकजण विचारत आहे की आमचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी काय केले? त्यांनी कधी संसदेत हा मुद्दा मांडला होता का? ते पुन्हा जिंकू शकतात पण या मुद्द्यावर ते आम्हाला विश्वास देत नाहीये.’
केरळमधील अनेक मतदारसंघांमध्ये हा प्रमुख निवडणुकीचा मुद्दा मानला जातो. पण वायनाडमध्ये परिस्थिती गंभीर दिसत आहे, जिथे या वर्षी आतापर्यंत तीन जणांना जंगली हत्तींनी चिरडून ठार केले आहे. एलडीएफ, काँग्रेस आणि भाजप या गंभीर संकटासाठी एकमेकांवर दोषारोप करत आहेत, ज्यामुळे आधीच अनेक शेतकरी कुटुंबे त्यांच्या जंगलालगतच्या जमिनीतून विस्थापित झाली आहे.