मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अतुल भातखळकर म्हणाले कि, तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या… त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल.
तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या… त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 16, 2020
महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही. अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार, अशी टीका त्यांनी केली आहे.
महा भकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही.
अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 16, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता, त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी सवाल केला, ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला होता.