मुंबई :- ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका तसेच आगामी एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा यासाठी भारतीय संघ निवड जाहीर झाली. मात्र, त्यात संजू सॅमसनला संधी दिली गेली नसल्याने अनेकांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.
लोकेश राहुल किंवा श्रेयस अय्यर दुखापतींनी त्रस्त असताना सॅमसनला संधी मिळते. मात्र, ते पूर्ण तंदुरुस्त आहेत का हेदेखील स्पष्ट झालेले नसताना सॅमसनचाच सातत्याने बळी दिला जातो. हे दोघे खेळाडू बीसीसीआयचे जावई आहेत का, असा रोखठोक सवाल चाहत्यांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरसह बीसीसीआयला केला आहे.
सॅमसनने जेव्हा संधी मिळाली तेव्हा सरस कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही चाहत्यांनी सोशल मीडियावर केला आहे.