मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने लवासा प्रकल्पावरील एका याचिकेचा निकाल सुनावताना पवार कुटुंबावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे महत्त्वाचे निरिक्षण नोंदवले आहे.
लवासा प्रकल्पाच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकला. लवासा प्रकल्प हा शरद पवार यांच्याच कल्पनेतून साकारला असल्याचे मतही न्यायालयाने नोंदवले.
मुंबई उच्च न्यायालयात लवासा प्रकल्पाविरोधात याचिका दाखल होती. या याचिकेत पवार कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याची सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरुस्ती योग्य असल्याचे म्हटले.
परंतु पवार कुटुंबियांनी प्रकल्प अजित गुलाबाचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपांत तथ्य असल्याचेही महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवले. असे असले तरी प्रकल्प झाला असून आणि त्याविरोधातील याचिका खूपच विलंबाने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच लवासा प्रकल्पाविरोधातील ही याचिका निकाली काढली.