मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत टीका केली आहे.
आव्हाड यांनी ट्विट केले आहे कि,,’6 डिसेंबर ला चैत्य भूमी ला भेट देणाऱ्या बंधू भगिनींन बद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या तुमचे भाषण च संविधान विरोधी होते आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम हि म्हणा निवडणुकी साठी वाट्टेल ते’ तसेच याबरोबर त्यांनी हिंदी सिनेमातील
‘जब भी जी चाहे नै
दुनिया बसा लेते है लोग
जब भी जी चाहे नै
दुनिया बसा लेते है लोग
एक चेहरे पे कई
चेहरे लगा लेते है लोग’
व्हिडिओ शेअर करत आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
6 डिसेंबर ला चैत्य भूमी ला भेट देणाऱ्या बंधू भगिनींन बद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेले नाही
नुसत्या मिरवणूका काय काढायला सांगता संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या
तुमचे भाषण च संविधान विरोधी होते
आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम हि म्हणा
निवडणुकी साठी वाट्टेल ते pic.twitter.com/vq7KStA5WE— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022