मुंबई: राम मंदिर बांधून कोरोना जाणार का? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं. भाजपने पवारांवर टीका देखील केली होती. दरम्यान, शरद पवार यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्प्ष्ट केली.
शरद पवार म्हणाले, राम मंदिराबाबत कोणताही वाद नसून सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे. मी राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे.