मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
राम मंदिर बांधून करोना जाणार काय? असे विधान शरद पवार यांनी केले होते. यावर भाजपने जोरदार आक्षेप घेत राज्यभर आंदोलने केली. याबाबत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, बरोबर आहे. डॉक्टर्स हवेतच. आपण ज्या सुविधा निर्माण करतो आहोत या सुविधा रुग्ण बरा करणार नाही. या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत. मी आधीच जे म्हटले होते की, जंबो फॅसिलिटी हवी. म्हणजे आम्ही काय बेडचं दुकान नाही काढलेले. फर्निचरचं दुकान नाही काढले. प्रदर्शन नाही भरवले. या बेडवर जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि सिस्टर पाहिजे आणि हातात औषधे पाहिजेत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.