मुंबई – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. विविध सहा ठिकाणी स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बांगलादेशातील गरिबीसह उपासमारीला कंटाळून ते सर्वजण बांगलादेशातून मुंबईत पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या नऊ जणांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच बोरिवली येथून मोहम्मद मोहीउद्दीन, बाबू मलिक, अब्दुल मलिक या दोघांना कस्तुरबा मार्ग,
दादर येथून जनाबअली अतियारवन गाझी, इसाक असिरुद्दीन मंडोल, मोहम्मद इक्बाल नजीर खान ऊर्फ राजू अनिल दास या तिघांना भोईवाडा आणि दादर पोलिसांनी तर गोरेगाव येथून मेहबू जाफर शेख, एंटॉप हिल येथून सुलेमान गयासुद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.