आपापसातील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न करा
नवी दिल्ली, दि. 18 – आपापसातील मतभेद मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा व पश्चिम बंगालच्या प्रगती व कल्याणासाठी एक संघ व शिस्तबद्ध पक्षाप्रमाणे कामे करा, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी व कॉंग्रेस अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी पश्चिम बंगाल कॉंग्रेस व सरकारातील विविध गटांना आज केले.
ही बैठक नव्वद मिनिटे चालली. मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सूचनांचे पालन करण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
योजना अपुऱ्या असतील तेथे व्याज माफ करू
पुणे – पुणे जिल्ह्यातील ज्या लिफ्ट इरिगेशन योजना अपूर्ण आहेत त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिले.
तामिळांवर हिंदी लादणार नाही
मद्रास – तामिळनाडूतील जनतेवर कोणत्याही प्रकारे “हिंदी’ लादली जाणार नाही, या आश्वासनाचा केंद्रीय गृहमंत्री के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी पुनरुच्चार केला. दिवगंत पंतप्रधान पंडित नेहरू, लालबहादुर शास्त्री व सध्याच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख रेड्डी यांनी यावेळी केला.