मृत्यूदेखील स्वातंत्र्याची उर्मी दाबू शकणार नाही
मुंबई, दि. 7 – जो जो विचारवंत आहे, त्याने राष्ट्रहिताचे जे कार्य असेल त्याला सामोरे गेले पाहिजे, अशी हाक दुर्गाबाई भागवत यांनी दिली. ध्येयसृष्टीशी कार्यसृष्टीचा मेळ घालू शकत नाही, तो खरा विचारवंत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, देशाच्या कल्याणाच्या दृष्टीने थोर कार्य करू इच्छील त्यांनाच मान देणे हे त्यांचे कर्तव्य असते. या जनसागरासमोर माझ्यासारख्या लेखणी चालविणाऱ्या बाईला बोलावे लागेल अशी मला स्वप्नातही कल्पना नव्हती. पण स्वप्नात नसलेली गोष्ट आज प्रत्यक्षात उतरली आहे.
औद्योगिक कामगारांना स्वतःची घरे
पुणे – महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाच्या मालकीच्या सुमारे 41000 गाळ्यांतून सवलतीच्या भाड्याने राहणाऱ्या औद्योगिक कामगारांना ते गाळ सुलभ हप्त्याने विकत देण्याचे मंडळाने ठरविले आहे. गाळ विकून आलेली रक्कम शहरी विभागात राहणारे औद्योगिक कामगार आणि गरीब वर्गाला घरे पुरविण्याच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
भारत-बांगलादेश व्यापार सुधारणार
नवी दिल्ली – भारत व बांगलादेश यांच्यातील व्यापाराचा समतोल सुधारण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील.