मुंबई – दिनेश कार्तिकला भारताच्या टी-20 संघात पुनरागमन करण्याची संधी निश्चितच आहे. मात्र, निवड समितीने त्याच्या वयाकडे पाहण्यापेक्षा त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीकडे पाहावे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
2004 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर कार्तिकने जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा फिनिशरच बनल्यासारखा वाटतो. संघाला बिकट स्थितीतून त्याने बाहेर काढत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत निवड समितीने त्याचा विचार करावा, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.