पुणे – राज्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भोंग्यावरून केलेले विधान,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला, राष्ट्रवादीच्याआमदार अमोल मटकरींचे ब्राह्मण समाजावर केलेले विधान, नवनीत राणा याचं हनुमान चालीसा पठण – मातोश्री निवासस्थान, तर दुसरीकडे भारनियमन, कोळसा टंचाई, माजी खासदार राजू शेट्टीचें महाविकास आघाडीतून बाहेर पडणे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप ,राष्ट्रवादीची संवाद, यात्रा असं काहीस चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
उध्वस्त ठरकी ने कुठे नेवून ठेवला आहे आमचा महाराष्ट्र …. ? #Maharashtra #Maharashtraunderattack
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 23, 2022
यामध्ये महाविकास-आघाडी -विरोधी पक्ष यांच्यातील प्रमुख नेत्यांमध्ये शाब्दिक हल्ले सुरूच आहेत. यावर आता माजी मुख्यंमत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेवून ठेवला आहे आमचा महाराष्ट्र …. ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याव्यतिरिक्त्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा,संत परंपरेचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात ‘हनुमान चालीसा’ म्हणू नये म्हणून हिंदूंना अटक होते ते देखील शिवसेनेच्या दबावामुळे..याहून दुसरं दुर्दैव काय असू शकतं ? हे सरकारला विचारलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा,संत परंपरेचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात 'हनुमान चालीसा' म्हणू नये म्हणून हिंदूंना अटक होते ते देखील शिवसेनेच्या दबावामुळे..याहून दुसरं दुर्दैव काय असू शकतं ?
#Maharashtra #NavneetRana #MVA #Shivsena— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2022
याआधी ही केली होती सरकारवर टीका
फडणवीस म्हणाल्या, राज्य सरकार कमालीचे उदासीन असून एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपासून अधिक काळ चालला तरी त्याच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कामगार मेटाकुटीस आलेला असताना त्यांना सरकारने मदत देणे गरजेचे असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, अशा पद्धतीच्या घटना होण्यामागे नेमकं कारण काय आहे? याचाही शोध घेणे गरजेचे आहे असे फडणवीस म्हणाल्या.