मुंबई -रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या कारकिर्दीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमात तो सातत्याने अपयशी ठरत आहे.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तर तो पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला. तब्बल पाच वर्षांनंतर त्याच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर शनिवारी झालेल्या हैदराबादविरूध्दच्या सामन्यात देखील कोहली विराट शून्यावर बाद झाला. विराट कोहलीची आयपीएल 2022 च्या या मोसमात शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली.
कोहली बाद झाल्यावर लगेचच टीकाकार व समालोचकांनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. आता येत्या काळात बेंगळुरू संघाकडून उर्वरित सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत तर त्याच्या कारकिर्दीवर पूर्णविराम लागेल, असेही या टीकाकारांनी म्हटले आहे.