नवी दिल्ली – साखर कारखान्यांनी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांना 78 हजार कोटी रुपयांचे वितरण केले असल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. साखर वर्ष या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून पुढील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत समजले जाते. (Distribution of 78 thousand crores of rupees by sugar factory to farmers; Information from Union Ministry of Food)
सध्या साखर कारखान्याचे काम चालू असून एकूण 90 हजार कोटी रुपयांपैकी 87 टक्के म्हणजे 78 हजार कोटी रुपये शेतकर्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी जवळजवळ 300 लाख टन साखर तयार केली आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने उसाची किमान आधारभूत किंमत 315 प्रती क्विंटल अशी ठरविली होती. याच दराने साखर कारखाने शेतकर्यांना ऊसाची किंमत देत आहेत. गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी 1.15 लाख कोटी रुपये उत्पादक शेतकर्यांना देणे अपेक्षित होते. त्यातील 99.7% रक्कम शेतकर्यांना देण्यात आली आहे. हे सर्व देणे साखर कारखान्यांनी पूर्ण केले आहे.