Congress – बिहार सरकारने जातनिहाय (caste-wise) जनगणनेचा अहवाल कालच जारी केला आहे. या मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्षांनी बिहार सरकारचे समर्थन केले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क असा मुद्दा मांडला आहे.
मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल यांच्या भूमिकेविषयी असहमती दर्शवली असल्याचे वृत्त आहे. सिंघवी यांनी सोशल मीडियावर जातगणनेबाबत एक पोस्ट शेअर केली होती. संधीची समानता ही परिणामांची समानता असू शकत नाही.
जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क या मुद्द्याचे समर्थन करणाऱ्यांनी एक गोष्ट समजणे गरजेचे आहे ते म्हणजे त्याचे परिणाम काय असतील? ते अगोदर जाणून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, सिंघवी यांनी ही पोस्ट केल्यावर काही वेळातच ती डिलिट केली. मात्र त्यांची ही पोस्ट राहुल यांच्याच भूमिकेला छेद देणारी होती. त्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे.