Dilip Ghosh Controversial । निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करू शकते. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष आपापले मतदारसंघ मजबूत करण्यात व्यस्त आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या आकड्यांच्या पुढे जायचंय. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते कसून मेहनत करतायेत.
बंगालमधील संदेशखाली प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संदेशाखालीच्या मुद्द्यावरून भाजप तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेतृत्वाखालील ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील भाजप खासदार दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी आणि टीएमसीवर राज्याचे मोठे नुकसान केल्याचा आरोप केला.
यासोबतच,”जर पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढू शकतात, तर त्यांना बंगालमध्ये पसरलेल्या अराजकतेवर तोडगा काढण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतील.असे वादग्रस्त विधान देखील दिलीप घोष यांनी केलंय.
‘टीएमसी गुंड आणि बलात्कार करणाऱ्यांना संरक्षण देते’ Dilip Ghosh Controversial ।
संदेशखालीतील प्रमुख आरोपी शेख शाहजहानच्या अटकेतील दिरंगाईवर टीएमसी सरकारवर टीका करताना दिलीप घोष यांनी,”गुंड आणि बलात्कार करणाऱ्यांना टीएमसी संरक्षण देते,मात्र विरोधी पक्ष आणि मीडियाच्या दबावानंतरच त्यांना अटक करण्यात आली होती.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
एका वृत्तसंस्थेनुसार, “राज्याच्या कानाकोपऱ्यात गुंड आणि बलात्कारी आहेत, ज्यांना टीएमसीच्या झेंड्याखाली संरक्षण दिले जाते. टीएमसीने एका गुन्हेगाराला, बलात्कार करणाऱ्याला दोन महिने वाचवले. “आमच्या निषेधानंतर आणि मीडियाच्या दबावानंतर, राज्य पोलिसांना त्याला अटक करण्यास भाग पाडले गेले आणि त्याला लवकरच पक्षातून निलंबित करण्यात आले.”
‘पंतप्रधान मोदी दोन मिनिटांत बंगालला थंड करतील’ Dilip Ghosh Controversial ।
दिलीप घोष पुढे म्हणाले, “टीएमसीने बंगालचा नाश केला आहे. त्यांनी संपत्तीपासून महिलांच्या प्रतिष्ठेपर्यंत सर्व काही लुटले आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरचा प्रश्न सोडवू शकत असतील तर त्यांना बंगाल थंड करायला फक्त 2 मिनिटे लागतील.” असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलंय.