मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना कोरोनाबाधितांची संख्या १२६ वर पोहचली आहे. तर सर्वाधिक कोरोनाचे ३९ रुग्ण महाराष्ट्रात आहे. या कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयात विलीगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.
दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने उपाय योजना सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाचे देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील मुंबईतील सिद्धिविनाय मंदिर, मुंबादेवी, कोल्हापूर जिल्यातील नरसोबाची वाडी, जोतिबा मंदिर, तुळजापुरातील भवानी मंदिर, रत्नागिरीमधील गणपतीपुळे, साईबाबाब मंदिर, शिर्डी, गजानन महाराज मंदिर शेगाव आणि संत तुकाराम मंदिर देहू आदी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.