मुंबई – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पण संचारबंदीची अंमलबजारवणी करताना पोलिसांना खूप मेहनत करावी लागत आहे. मुंबईतील काही भागात लोक काहीही कारण नसताना देखील घरा बाहेर पडत आहे. काही भागात पोलिस या लोकांना समजावून घरी पाठवत आहे. तर काही ठिकाणी कायद्याचा वापर करावा लागत आहे.
मुंबईतील डोंगरी भागाचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी आपल्या भागात फिरुन माईकवरुन लोकांना घरी राहण्याबाबत सूचना देत होते. डोंगरीतील टेमकर स्ट्रीट भागात कर्फ्यू असताना देखील मोठ्या प्रमाणात लोक मशीदीत नमजासाठी जमले होते. यावर अविनाश धर्माधिकारी यांनी कडक कारवाई करत जमलेल्या लोकांना बाहेर काढत मशीदीला ताळं ठोकलं. तसेच याविरोधात गुन्हा देखील नोंदवला. काही भागात लोकांनी पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली.
यावर सहायक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी बहुतेक लोकांना वाटतं आहे की त्यांना काही होणार नाही. आम्ही त्यांना कोरोनाच्या गंभीरतेबाबत समजवत आहोत. जे लोकं आमचे म्हणणं ऐकतं नाही अशांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.