औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेला आता वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा विरोध केला आहे. राज यांच्या सभेमुळे शहरातील शांतिप्रिय नागरिक चिंतीत झाले असून, त्यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना चालू असून राज ठाकरे यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नयेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. दरम्यान, आपल्याला वातावरण बिघडवण्याची इच्छा नसल्याचे राज यांनी म्हटले आहे. मात्र तरीही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून संभाव्य तणावाची भिती व्यक्त केली जाते आहे.