मुंंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना 300 घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. मुख्यमंत्री यांनी केलेल्या या घोषणेचा भाजप आणि मनसे कडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरांबाबतचा निर्णय कदाचित रद्द केला जाईल असे मोठे विधान केले आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदारांना देऊ केलेली ही 300 घरे राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेल्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतून ही घरे देण्यात येणार होती. या निर्णयाला सामान्यांनी विरोध सुरु करताच ही घरे फुकट देणार नसल्याचे मंत्री आव्हाड यांनी नंतर सारवासार केली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलेल्या विधानावरून आमदारांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली घरे रद्द होणार ही आमदारांना घरे मिळणार हे अद्याप तरी निच्छित नाही.