मुंबई : नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील कारवाईवर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी सतीश उके यांच्यावरील झालेल्या कारवाईनंतर नाना पटोले यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सतीश उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले यांनी एक ट्वीट केले आहे. ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 31, 2022
‘मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, असे ट्वीट करत पटोले यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.