मुंबई – शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली असा घणाघात शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर घडलेल्या प्रकारचा एक किस्सा देखील सांगितला. तसेच रामदास कदम यांना आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले.
रामदास कदम यांनी शिवसेना आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते नुसतेच आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केलं ते जनतेला सांगावे असं कदम म्हणाले होते. यावर विनायक राऊत यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.
रामदास कदम यांनी शिवसेनेवर टीका केली होती त्यावर देखील राऊत यांनी यावेळी भाष्य केलं. नारायण राणे शिवसेना सोडून जात असतानाचा एक किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला. जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते, राणे गटात या असं शिवसैनिकांना सांगण्यात कदम हे आघाडीवर होते, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला आहे.