रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिंदे गटातील नेत्याला उमेदवारी देणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यापासून होती पण राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटाचे नेते यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
रामदास कदम म्हणाले,’कोकणात शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण हरकत नाही याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भगवतोय. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न, आम्हांला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्त्वाचे असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विधानसभेत शिवसेनेचा (shivsena) झंझावात दिसून येईल असेही रामदास कदम यांनी नमूद केले. रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बाेलताना ही जागा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती असे नमूद केले.
ते पुढे म्हणाले,’भाजपचे स्थानिक नेते माझ्यावर टीका करत आहेत. भाजपाने माझ्या विरोधात काम केले तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील असा इशारा देखील रामदास कदम’ यांनी भाजपाला दिला आहे.
हे वाचले का ? ‘नरेंद्र मोदी चहा विकून पंतप्रधान होऊ शकतात तर मी का नाही?’ ग्वाल्हेरचे आनंद कुशवाह यांनी भरला ‘अर्ज’