नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल यांचा लंडन चांगलाच चर्चेत आला आहे. सुरुवातीला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर टीका केली त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आणि सोबतच त्यांनी देशावर देखील हल्लाबोल केला. त्यांच्या या कृतीवर देशातून टीका होत आहेत. त्यातच आता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चांगलीच आगपाखड केली असून परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणं हे साफ चुकीचं आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच ‘भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे राहुल गांधी यांचं म्हणणं गैर आहे. भारताकडे G20 चे अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारतातला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही,”असे उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख राहुल गांधींकडेच होता.
#WATCH | VP Dhankhar takes a veiled attack at Rahul Gandhi’s speech made in UK
“If I observe silence on this orchestration by an MP outside the country,which is motivated,I’ll be on wrong side of Constitution. How can I sanctify statement that mics in Indian parliament put off?” pic.twitter.com/zSmllfosXI
— ANI (@ANI) March 10, 2023
जगदीप धनखड हे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन केले. त्या कार्यक्रमात राहुल गांधींचं नाव न घेता उपराष्ट्रपतींनी टीका केली आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले की भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने विदेशात जाऊन म्हणणं हा देशाचा अपमान आहे.असे म्हटले आहे.
त्यासोबतच सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय यामुळे आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातला एक खासदार देशाच्या विरोधात बोलतो तेदेखील बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचं हे हनन आहे असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत असाही आरोप केला होता. त्यानंतर भाजपानेही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तरीही राहुल गांधी यांनी हे बोलणं थांबवलं नव्हतं. या वक्तव्याच्या दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी देशाविषयी वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपतींनी नाव न घेता राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत.