मुंबई – कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. कॉमेडियन भारती सिंह आजकाल आपला मुलगा ‘लक्ष्य’ म्हणजेच गोलाच्या संगोपनात व्यस्त आहे. आपल्या मुलाची काळजी घेण्यासोबतच ती तिच्या कामाकडेही लक्ष देत आहे. सध्या कॉमेडियन तिचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. दररोज ती तिच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तिच्या मुलाशी संबंधित गोष्टी शेअर करते.
दरम्यान, नुकतंच भारतीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना भारतीने “आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच जास्त वजनामुळे टोमणे ऐकावे लागायचे, कित्येक लोकांनी तिला म्हैस, मोटी, गेंडा अशा नावांनी बोलावत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे’. असं भारतीने सांगितलं आहे.
ती पुढे म्हणते, “मी आता स्वतः हे मान्य केलं आहे की, मी वजनदार आहे. पण काय करु हलवाईची लेक आहे. मिठाई खाऊन खाऊन अशी झालेय…’ असंही भारतीने आपल्या मजेशीर अंदाजात सांगितलं. ज्यावेळी तिने हर्षसोबत लग्नाचा निर्णय घेतला, त्यावरुनही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. भारतीने हर्ष लिंबाचियासोबत 2017 मध्ये लग्न केलं आहे.