नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जाहीरपणे पत्रकारांशी चर्चा करून सरकारचे रिपोर्ट कार्ड राजस्थानच्या जनतेला देत असतात. पण आपल्या कारकिर्दीत पत्रकारांना सामोरे न जाणारे नेते भित्रे असतात, अशा शब्दांत गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बेनेश्वर धाम येथे केलेल्या वक्तव्याचा शर्मा यांनी समाचार घेतला.
जनतेला सुशासन देणे याला गेहलोत यांचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यांचे काम पारदर्शकपणे त्यांच्यासमोर ठेवण्याचे धाडस आणि हेतू आहे. अमित शहांवर ताशेरे ओढत लोकेश शर्मा म्हणाले की, ज्यांचे हेतू स्पष्ट नाहीत, अशांना पत्रकारांशी चर्चा करायला भीती वाटते. पण, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची आश्वासने आणि हेतू दोन्ही स्पष्ट आहेत.
केंद्रीय मंत्री शाह यांनी राज्यातील सत्ता परिवर्तनाच्या आवाहनावर लोकेश शर्मा म्हणाले की, गेहलोत यांनी राज्यात गॅस सिलिंडर 5 रुपयांना देण्यास सुरुवात केली आहे हे राजस्थानच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे. चिरंजीवी आरोग्य विमा योजनेंतर्गत अन्नपूर्णा फूड पॅकेट, 25 लाखांपर्यंतचे उपचार दिले जात आहेत.
सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना आधार देण्यात आला आहे. देशात प्रथमच कोणत्याही सरकारने राज्यातील जनतेला आरोग्याचा अधिकार दिला, किमान उत्पन्नाचा कायदा केला, खेड्यापाड्यात तसेच शहरांमध्ये रोजगाराची हमी दिली, ही काही उदाहरणे आहेत. अशा अनेक निर्णयांनी आणि योजनांनी लोकांचे सक्षमीकरण केले आहे. राजस्थानसाठी भाजपाने काय केले, हेही त्यांनी सांगावे.