मुंबई : ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्याच प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने समीर वानखेडेंना मोठा दिलासा दिला आहे. अटकेपासून देण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला असून याप्रकरणी आता ८ जूनला सुनावणी होणार आहे.
समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते.त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Case related to Aryan Khan’s drugs on the cruise case | Mumbai Court asks CBI to file their reply by 3rd June. Next hearing in the matter is on 8th June, Sameer Wankhede granted interim relief until then.
— ANI (@ANI) May 22, 2023
या आरोपा प्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. तपासानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आज उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटींवर ८ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. “प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा सीबीआयने कारवाई करावी,” असे उच्च न्यायालयाने म्हटले आहेत. तर, “तपासात सहकार्य आणि पुरव्यांशी छेडछाड करणार नाही. तसेच, तपासाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध न करून देणार नाही,” अशी हमी समीर वानखेडेंनी उच्च न्यायालयात दिली आहे. त्याच आधारावर न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे.