मुंबई – देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या राज्यामध्ये विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत असून शुक्रवारी राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळलेत. या कालावधीत कोरोनामुळे १८ जणांच्या मृत्यूची नोंद देखील झालीये.
अद्यावत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत ६८१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत ३०१ जणांना या कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ९५७ कोरोनाग्रस्तांची या आजारातून सुखरूप सुटका झालीये.