जालना – राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख उतरत असून राज्यातील निर्बंध कमी करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई, पुणे, रायगड सारख्या रुग्णसंख्येचा उच्चांक गाठलेल्या भागातली रुग्णसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी राज्यातल्या निर्बंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला टोपे उत्तर देत होते.
काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे. करोना रुग्णसंख्या उतरती आहे.48 हजारांवर गेलेली संख्या आता 10-15 हजारावर आलीये.
जिथे उच्चांक होता तिथेही रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आपण मार्चमध्ये एन्डेमिकपर्यंत जाऊ, असा अंदाज आहे. सगळ्या निर्बंधांबाबत बैठकीत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील.