नवी दिल्ली – जागतिक स्तरावर इतर अनेक देशांच्या तुलनेत कोविड मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 3.3 टक्के आहे. तर भारतामध्ये कोविड-19 मुळे होत असलेल्या मृत्यूदराचे प्रमाण 1.76 टक्के आहे.
प्रति दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर जागतिक पातळीच्या तुलनेमध्ये भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जागतिक सरासरी आकडेवारीनुसार प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 110 जणांचा मृत्यू कोविडमुळे होत आहे. तर भारतामध्ये हा आकडा 48 आहे. ब्राझील आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या तुलनेने जास्त म्हणजे अनुक्रमे 12 आणि 13 पट जास्त मृत्यू कोविडमुळे होत आहेत.
गेल्या एकूण 24 तासांत 62 हजार 26 कोविड रूग्ण बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात सध्या केवळ 21 टक्के सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या या सक्रिय रुग्णांपेक्षा 3.6 पट अधिक आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण चार पटींनी वाहिले आहेत.