वॉशिंग्टन – पॅन्गोंग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनी सैन्याने केलेला आक्रमणाचा प्रयत्न चीनने भारतीय जवानांना प्रक्षुब्ध करण्यासाठी जाणीवपुर्वक केलेला प्रयत्न होता, असे अमेरिकन गुप्तचरांनी म्हटले आहे.
भारत आणि चीनमध्ये धुमश्चक्री झाली होती त्यावेळी स्थानिक कमांडर्सनी आपली फौज मागे घेतली होती, त्याची सल चीच्या मनात आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. भारतीय जवनांनी कोणत्याही स्वरूपाची हानी होऊ दिली नाही. पॅन्गोंग त्सो हा हिमालातील उंचीवर असणारा प्रदेश भारताच्या ताब्यात आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. यू. एस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट या दैनिकांत याबाबातच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.
गलबान खोऱ्यात 20 जूनला झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय जवान चीनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी सज्ज आणि अधिक तयारीत आहेत. मात्र या अहवालात चीनने आधी आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख नाही. मात्र चीनच्या या पुर्वीच्या प्रक्षोभक कृतीचा इतिहास पाहता अमेरिका भारताला सक्रिय पाठींबा देईल असे म्हटले आहे.
चीनच्या या प्रक्षोभक कृती करण्याच्या वेळेबाबतही अमेरिकन गुप्तचरांनी लक्ष वेधले आहे. बिजिंग एका बाजूला भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापीत करू पहात आहे. किमान तसे बोलत तरी आहे, अशा वेळी ते आक्रमण करण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका, ऑस्ट्रलिया आणि जपानच्या अधिकाऱ्यांना भारतीय अधिकारी भेटत आहेत. या भेटी गुप्तचरांच्या माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.
मंत्री आणि सचिव अशा द्विस्तरीय आणि द्विपक्षीय चर्चेमुळे चीनी लष्कराच्या हालचालींबाबत गुप्तचरांचे अहवाल मिळण्यास भारताला मदत होणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे की, चीनने गेल्या दहा वर्षात संरक्षणसिध्दतेवर मोठा खर्च केला आहे. भारत आणि भूतानला लागून असणअऱ्या सीमेवर त्यांनी सज्जता केली आहे तसेच दक्षिण चीन सागरातही त्यांन विर्चस्व निर्माण केले आहे.