शहरात रोज होताहेत मृत्यू : 23 दिवसांत 40 बळी
एकाच आठवड्यात 19 रुग्णांनी गमावले प्राण
पिंपरी -“अनलॉक’ला सुरुवात होताच स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नागरिकांनी नोकरी व्यवसायास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे “करोना’चा उद्रेकही वाढत चालला आहे. जूून महिन्यात आतापर्यंत “करोना’चे शहरात 1500 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापेक्षाही चिंतेची बाब म्हणजे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जून महिन्यात आतापर्यंत “करोना’ने 40 बळी घेतले आहेत. यात शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.
सुरुवातीचे तीन महिने रुग्णसंख्या वाढत असतानाच शहरात मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असल्याने काहीसे दिलासादायक होते. गेल्या आठवडाभरात रोज शहरात “करोनाबाधित’ रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एक जून रोजीपर्यंत “करोना’ने शहरातील 9 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 15 जूनपर्यंत हा आकडा “करोना’मुळे शहरातील 22 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 19 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
तर मंगळवार दि. 23 जून रोजीपर्यंत शहरातील 35 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता.