मुंबई- कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. गेल्या तीन महिन्यांपासून चालू असणाऱ्या या लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच आयुष्य थांबली आहे. असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
दरम्यान, या लॉकडाउनचा चित्रपटसृष्टीला सुद्धा मोठा फटका बसल्याचे दिसून आले. ज्या सेटवर लाईट्स कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकू येत असे तिथे शुकशुकाट पसरला. कलाकारांची धावपळ, गजबजेलेले सेट्स, शूटिंगसाठी चोवीस तास राबणारी यंत्रणा थांबली. पण, आता मात्र सगळ हळूहळू पूर्ववत होताना दिसू लागले आहे. लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांचं शूटिंग पुन्हा एकदा सुरु होणार आहे. शूटिंगला जरी परवानगी मिळाली तर शूटिंगच्या ठिकाणी कलाकारांना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे.