नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पीएम केअर्स फंडातून काही राज्यांना व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आले पण हे व्हेंटिलेटर्स नादुरुस्त व कुचकामी असल्याच्या तक्रार वाढत आहेत. महाराष्ट्र, पंजाबपाठोपाठ आता राजस्थानातूनही या विषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला करोना लाटेचा फटका; ‘शक्तिशाली नेता’ प्रतिमेला धक्का
यातच बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीएम केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांत त्याचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत,डीएमसीएचचे अधीक्षक डॉ. मणि भूषण सांगतले की,’पीएम केअर्समधून व्हेंटिलेटर्स आले असतानाही त्याचा वापर का गेला नाही,कारण ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत.’
ते पुढे म्हणाले, ‘ड्राय-रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून, प्रकीर्या पूर्ण होताच हे व्हेंटिलेटर्स सुरू होऊन वापरात येतील, असे विश्वास भूषण यांनी व्यक्त केला आहे.’
दरम्यान,पीएम केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्समध्ये मोठ्या स्वरूपाचा घोटाळा झाला आहे आणि त्याच्या सखोल चौकशीची मागणी कॉंग्रेस पक्षानेही केली आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. महाराष्ट्र, दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये करोना परिस्थिती बिकट बनली आहे. देशात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी भयावह आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.परंतु असे असले तरी वाढत्या मृत्यू संख्येने देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे.